परदेशातून सहा हजारांवर नागरिक मायदेशी : सौरभ राव
महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : वंदेभारत या मिशनअंतर्गत पाचव्या टप्प्यापर्यंत आज पाच ऑगस्ट अखेर परदेशातून 6 हजार 313 नागरिकांचे आगमन मायदेशी झालेले आहे. पाचव्या टप्प्यामध्ये 10 मे 2020 ते आज अखेर 215 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 294 सातारा जिल्हयातील 348, सांगली जिल्हयातील 254, सोलापूर जिल्हयातील 301 तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त् सौरभ राव यांनी दिली.