धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ

महाबुलेटीन न्यूज / संतोष म्हस्के
भोर : तालुक्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केली होती. मात्र बुधवार ( दि. ५ ) सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र व भाटघर, नीरा-देवघर धरण पट्ट्यात जोरदार पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. सद्यस्थितीला भाटघर ५२ टक्के तर नीरा-देवघर धरणात ४० टक्के पाणी असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत दोन्ही धरणांत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच पाणी पातळीत वाढ होणार आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.