गौरी आल्या डॉक्टर रुपात…!
महाबुलेटिन नेटवर्क । प्रतिनिधी
राजगुरूनगर : सामाजिक भान जपण्याचा आणि स्वतःसोबत समाजाचीही काळजी घेण्याचा संदेश त्यांनी दिला. हा संदेश देणाऱ्या त्या गौरी होत्या. डॉक्टरांच्या रुपात त्या आल्या आणि लक्ष वेधून गेल्या….
देशावर कोरोनाचे संकट आहे. महामारीने संपूर्ण जगाचा वेग मंदावला. वैश्विक संकटावर मात करण्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने आपापली जबाबदारी पेलण्याची. त्यासाठी जनजागृती व सामाजिक बांधीलकी महत्त्वाची आहे. अशातच, राजगुरूनगरमधील सायली व राहुल शंकर कहाणे यांनी आपल्या घरी डॉक्टर रुपात गौराई बसवून मास्क व सोशल डिस्टन्सचे नियमांचे पालन करुन कोरोनावर कशी मात करता येईल याचे मार्गदर्शन व संदेश दिला आहे. मास्कचा वापर करा, कोरोनाबाबत काळजी घ्या वगैरे संदेश डॉक्टर रूपातील गौराईने दिला. ही संकल्पना निश्चितच दाद देण्याजोगी म्हणावी लागेल.