आळंदीतील वारकरी विद्यार्थ्यांना धान्य, किराणा ( शिधा ) देण्याचे आवाहन…
आळंदीतील वारकरी विद्यार्थ्यांना धान्य, किराणा ( शिधा ) देण्याचे आवाहन…
महाबुलेटीन न्यूज
सलग दुसऱ्या वर्षीही निर्माण झालेल्या कोरोनाच्या महामारीमुळे आळंदीतील शेकडो वारकरी विद्यार्थी अडचणीत आलेले आहेत. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून आपल्या सारख्या दानशूरांच्या मदतीने गावातून धान्य दान यज्ञ आरंभीलेला आहे. खराबवाडी गावातील हनुमान मंदिरात दानशूर ग्रामस्थांनी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तेल, डाळी, आदी किराणा माल असा कोरडा शिधा जमा केला असून अजूनही आपण यथाशक्ती वारकरी विद्यार्थी यासाठी धान्य, किराणा अशी वस्तू स्वरूपात मदत करावी, असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.