न्हावरा – तांदळी महामार्ग रस्ता रुंदीकरणामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा : मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : शिवसेना उपनेते, संपर्क प्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी न्हावरा – तांदळी या NH 548 या महामार्ग रस्ता रुंदीकरणामुळे न्हावरा, निर्वी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव व तांदळी या गावांमधील 600 शेतकरी बाधित होत आहेत, याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्याबराेबर बैठक घेवुन बाधीत शेतकर्यांचे प्रश्न मांडुन रस्ता रूंदीकरण करताना योग्य मोबादला मिळाला पाहिजे अशी भुमिका घेतली.
यावेळी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, ज्ञानेश्वर (माऊली) कटके ( जिल्हाप्रमुख ), रविंद्र करंजखेले ( जिल्हा समन्वयक ), मच्छिद्र गदादे ( जिल्हा समन्वयक ), सुधीर फराटे ( तालुका प्रमुख ), पोपटराव शेलार ( उपजिल्हा प्रमुख ), विरेन्द्र शेलार ( विधानसभा संघटक ), शिवाजीराव मचाले ( माजी उपतालुका प्रमुख ), विजयबापू मोकाशी ( संचालक, माजी उपसरपंच इनामगाव ), राजेंद्र कोरेकर ( माजी अध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी ), राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब घाडगे ( शेतकरी संघटना ), रावसाहेब फराटे, ॲड. हिलाळ लक्ष्मण बाबा कळसकर ( मा उपसरपंच ), दत्तात्रय नलगे ( माजी उपसरपंच ), दिपक कोकडे, दशरथ बनकर, किरण नवले, अक्षय पारखे, विपुल कळसकर, भुजंगराव कळसकर, नाना कळसकर, संदीप कदम, स्वप्निल काटे, प्रशांत चव्हाण, जालिंदर मचाले, पोपटराव गदादे ( माजी चेअरमन ) तसेच विविध विभागाचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.