खेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रराजकीयविशेष

भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी व डाऊ आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शरद बुट्टे पाटलांना आश्वासन

महाबुलेटीन न्यूज

चाकण एमआयडीसी : भामाआसखेड धरणग्रस्त शेतकरी डाऊ आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी आश्वासन दिले.

आज ( दि. २० ऑगस्ट ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वराळे येथे मोठ्या उत्साहात स्वागत केले. भामा आसखेड धरणग्रस्तशेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तसेच डाऊ कंपनी विरोधात आंदोलन केलेल्या शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घ्यावी यासाठी जिल्हापरिषदेचे भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी त्यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी आपण शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेऊ असे बुट्टे पाटीलयांना आश्वासन दिले. त्याचप्रमाणे अन्य काही विकास कामांसंबंधी निवेदन त्यांना दिली.


अतिशय आपुलकीने त्यांनी सगळ्यांचे स्वागत स्वीकारले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भामा खोऱ्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!