बैल नसल्याने शेतकर्याने दुचाकीला जोडले कोळपे

लातुर : सध्याच्या महागाईच्या काळात शेती करणे एक आव्हान आहे. दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून येणारे उत्पन्न आणि त्यासाठी झालेला खर्च यांचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यानेही आता पारंपरिक पद्धतीने शेती करणे सोडून आधुनिकतेची कास धरली आहे. यातही काही सृजनशिल शेतकरी वेळ व पैसा वचविण्यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढत आहेत. लातुर जिल्ह्यातील येरोळ ( ता. शिरूरअनंतपाळ ) येथील तरुण शेतकरी महालिंग सिंदाळकर याने आपल्या शेतातील सोयाबीनचे पीक कोळपण्यासाठी अशीच एक शक्कल लढविली आहे.
शेतात पिकांची कोळपणी ही बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. मात्र, महालिंग सिंदाळकर यांनी बैलांचा उपयोग न करता कोळपे यंत्र मोटरसायकलला बांधून कोळपणी सुरू केली आहे. कसलाही पैसा खर्च न करता मोटार सायकलच्या सिटवर जुवासारखे लाकडी दांडी बांधुन त्याला दोन दुंडे बांधले. व पाठीमागे दोघांनी दुंडे धरूण कोळपणी सुरू केली. अत्यंत किफायतशीर व कोळपणी योग्य असलेले कोळपे मोटरसायकलला जोडून सोयाबीनच्या पिकांची कोळपणी केली. त्यांच्या या आयडियाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून अनेक शेतकरी त्यांचे अनुकरणही करीत आहेत. या तंत्रामुळे कमीत कमी वेळेत कोळपणी होते. शेतकऱ्यांना हे मोटार सायकला परवडणारे असून यामुळे वेळेचीही बचत होते. यामुळे पिकांचे नुकसानही होत नाही, असे कृषी सहाय्यक ओम अंधारे यांनी सांगितले.