कृषीप्रादेशिकमहाराष्ट्रमुंबईविशेष

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या अजित पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
महाबुलेटीन न्यूज । किशोर कराळे
मुंबई, दि. ११ जून : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!