मुंबईत ९ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास प्रारंभ, समुद्र किनारी नयनरम्य दिंडी सोहळा
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : आज ( दि. २१ डिसेंबर २०२० ) मुंबई जुहू येथील हाँटेल नोवोटेल येथे ९ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची समुद्र किनारी नयनरम्य दिंडी सोहळ्याने सुरुवात झाली.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, माजी राज्यपाल डॉ. डि. वाय. पाटील, डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल पाटील, संजय घुंडरे (पाटील), चैतन्य कबीर बुवा, बापूसाहेब देहूकर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रमुख व्यक्तिंच्या उपस्थितीत साहित्य संमेलनास प्रारंभ झाला.