दिन विशेषविशेष

महाबुलेटीन दिनविशेष : २ जानेवारी 

 

महाबुलेटीन  दिनविशेष : २ जानेवारी 

********************************
२ जानेवारी – भारतरत्न पुरस्काराची सुरुवात
********************************

सुरुवात – २ जानेवारी १९५४

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २ जानेवारी १९५४ रोजी झाली.

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. क्रीडा, साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना भारत सरकार तर्फे देण्यात येतो.

१९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली.

२०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले.

आतापर्यंत ४८ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.

पहिला भारतरत्न पुरस्कार हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २ फेब्रुवारी १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

१९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.

‘भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपी मध्ये ‘भारतरत्न’ कोरलेले असते.

मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.

सन्मानित व्यक्तींची यादी :
————————————
०१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४)
०२. चक्रवर्ती राजगोपालचारी (१९५४)
०३. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१९५४)
०४. डॉ. भगवान दास (१९५५)
०५. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१९५५)
०६. जवाहरलाल नेहरू (१९५५)
०७. गोविंद वल्लभ पंत (१९५७)
०८. धोंडो केशव कर्वे (१९५८)
०९. डॉ. बिधान चंद्र रॉय (१९६१)
१०. पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)
११. डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२)
१२. डॉ. झाकिर हुसेन (१९६३)
१३. पांडुरंग वामन काणे (१९६३)
१४. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर-१९६६)
१५. इंदिरा गांधी (१९७१)
१६. वराहगिरी वेंकट गिरी (१९७५)
१७. के. कामराज (मरणोत्तर – १९७६)
१८. मदर तेरेसा (१९८०)
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर-१९८३)
२०. खान अब्दुल गफार खान (१९८७)
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर-१९८८)
२२. डॉ.आंबेडकर (मरणोत्तर-१९९०)
२३. नेल्सन मंडेला (१९९०)
२४. राजीव गांधी (मरणोत्तर -१९९१)
२५. सरदार पटेल (मरणोत्तर-१९९१)
२६. मोरारजी देसाई (१९९१)
२७. मौलाना आझाद (मरणोत्तर-१९९२)
२८. जे.आर.डी. टाटा (१९९२)
२९. सत्यजित रे (१९९२)
३०. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७)
३१. गुलझारीलाल नंदा (१९९७)
३२. अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर-१९९७)
३३. एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९९८)
३४.चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९९८)
३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर-१९९९)
३६. रवी शंकर (१९९९)
३७. अमर्त्य सेन (१९९९)
३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर-१९९९)
३९. लता मंगेशकर (२००१)
४०. बिसमिल्ला खान (२००१)
४१. भीमसेन जोशी (२००८)
४२. सी.एन.आर.राव (२०१४)
४३. सचिन तेंडुलकर (२०१४)
४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर-२०१५)
४५. अटलबिहारी वाजपेयी (२०१५)
४६. नानाजी देशमुख (२०१९)
४७. भूपेन हजारिका (२०१९)
४८. प्रणव मुखर्जी (२०१९)

********************************

************************************************०२ जानेवारी – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जयंती

********************************************

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

जन्म – २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी)
मृत्यू – २ जानेवारी १९४४

विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला. मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या.

ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

जीवन : शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्.एल.बी. परिक्षेकरिता मुंबईला गेले. तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘’डिप्रेस्ड क्लास मिशन’’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

लेखन : शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो.मा. पवार यांचे असून ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

आत्मचरित्र : ‘माझ्या आठवणी व अनुभव’ नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.

शेतकरी चळवळ : शिंदे यांनी १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.

संदर्भ : विकिपीडिया

********************************

*************************************
०२ जानेवारी – शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर स्मृतिदिन
********************************************

डॉ वसंत गोवारीकर

जन्म – २५ मार्च १९३३ (कोल्हापूर)
मृत्यू – २ जानेवारी २०१५

अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला.

कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले.

अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वर्षे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे.

१९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.

********************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!