महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई, ( दि. ११ डिसेंबर ) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पंचायत राज्य सार्वत्रिक निवडणूक २०२१ ते २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या १४ हजार ६३४ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम आणि आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आजपासून आचारसंहिता लागू होत असून सदर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली.
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. २३ डिसेंबरपासून ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. दि. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील औरंगाबाद विभागातील ४ हजार १३४ ग्रामपंचायतींचा समावेश असून पुणे विभागात २ हजार ८७०, नाशिक विभाग २ हजार ४७६, अमरावती विभाग २ हजार ४४८, नागपूर विभाग १ हजार ५०८ आणि कोकण विभागातील ७९८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायती, पालघर ३, रायगड ८८, रत्नागिरी ४७९ आणि सिंधुदुर्ग ७० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३, सांगली १५२, सातारा ८७९, सोलापूर ६५८ आणि पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
———
■ पुणे जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायती, तर खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
——–
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.