राजकीय

राजकीय किस्से : याला म्हणतात कार्यकर्त्यांना ताकद देणं….

महाबुलेटिन नेटवर्क | शिवाजी आतकरी
अनेक नेते आपल्या वागण्या बोलण्यातून आपली छाप सोडतात. असे नेते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरतात. लोकनेता ही पदवी त्यांच्या नावासोबत जोडली जाते ती त्यांच्या माणसे जपण्याच्या कृतीमुळेच.
         खेड तालुक्याच्या राजकारणावर ऍड शांतारामबापू गारगोटे यांनी अशीच आपली छाप सोडली. त्यांच्या हयातीत त्यांना वगळून तालुक्याची राजकीय गणिते मांडणे अशक्य होते. काँग्रेस संस्कृतीच्या मुशीत तयार झालेले शांताराम गारगोटे यांनी त्यांच्या राक्कीय कारकिर्दीत अनेक मोठ्या नेत्यांचे पैलू जवळून पाहिले. त्यांनी सांगितलेला एक किस्सा  आजही आठवतोय.
               बापूंनी राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला. कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची, कार्यकर्त्यांची किंमत, वजन कसे वाढवायची हे काही नेत्यांना पक्के माहीत होते. पूर्वी मोबाईल सोडा, टेलिफोनही कार्यकर्ते, तालुका पातळीवरील अनेक नेय्यांकडे नव्हते. बरीच वर्षे झाली. एकदा प्रांत कार्यालयातील शिपाई माझ्याकडे घरी घाईने आला. थोपटेसाहेबांचा फोन आला होता प्रांतसाहेबांना. आपणास तातडीने ऑफिसमध्ये बोलावलंय साहेबांनी.
यानंतर बापू कार्यालयात गेले वगैरे सर्व ओघाने आले.
    या घटनेबाबत अधिक सांगताना बापू म्हणाले होते, आपले कार्यकर्ते गरीब आहेत. शासकीय कार्यालयात ते जनतेची कामे घेऊन जातात. अनेक अधिकारी त्यांना दाद देत नाहीत. अशा कार्यकर्त्यांची किंमत होते. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही नेतेमंडळी अशापद्धतीने फोन करत. थेट मंत्री फोन करतो, कार्यकर्ते, तालुक्यातील नेत्यांशी बोलतो, चौकशी करतो, याचा अर्थ अधिकारी समजून जातो. कार्यकर्त्यांचे बळ वाढते. अनंतराव थोपटे हे लोकनेते अशापद्धतीने कार्यकर्त्यांना जपत. त्यांची बुज ठेवत. थोपटेसाहेब व त्यांच्या पिढीतील मंडळींनी कार्यकर्ते असे सक्षम करून पक्ष बळकटी साधली होती. असेच त्यांचे अनेक किस्सेही स्व बापूंनी सांगितल्याचे आठवते.
admin

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.