महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : बैलपोळा सण आल्यामुळे राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन शहरातील जनता कर्फ्यु व नागरिकांची तपासणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शुक्रवार दि. १८ व शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या अगोदर जाहीर केलेल्या १५ व १६ या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत.
राजगुरुनगर, आळंदी, चाकण ह्या तीनही शहरातील व्यापार अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळून दि.१८ आणि दि. १९ रोजी पुर्णपणे बंद रहाणार आहे. त्या दिवशी नागरिकांची फक्त आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घरीच थांबून घरी येणाऱ्या आरोग्य सेवकास खरी माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.