आंदोलन

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा सुजान नागरिक मंचचा इशारा

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा सुजान नागरिक मंचचा इशारा

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी सुजान नागरिक मंचच्या वतीने ईमेलद्वारे निवेदन पाठवून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे वा ना घेणे या विषयावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार फक्त यु जी सी लाच आहेत. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय तसेच नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. शाळा कॉलेज आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्र बंद आहेत. घराबाहेर पडणे म्हणजे कोरोनाला बळी पडणे असे भयानक संकट आपल्यावर आले आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावी बारावी आणि इतरही परीक्षा रद्द केल्या. या निर्णयाने विद्यार्थी आणि पालकांना आनंद झाला आहे.

परीक्षा आज किंवा उद्या कधीही घेता येईल, परंतु परीक्षांसाठी मुलांचे आरोग्य किंवा आयुष्य धोक्यात घालणे योग्य नाही. या सर्व धोक्याची जाणीव असूनही यु जी सी मुलांचे आरोग्य ,पर्यायाने समाजाच्या आरोग्याला धोक्यात का घालत आहे, हे समजण्यापलीकडे आहे. कोरोना बाधीतांच्या आकडेवारीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी चिंताजनक होत आहे. केंद्र व राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल ही काळजी करू नये. कोरोना आटोक्यात आल्यावर त्यावर उपाय योजना करता येईल. शिक्षण तज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील सामाजिक संघटनांचा सल्ला घेवून यावर मार्ग काढता येवू शकतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरासरी मार्कस आणि अजून अॅडिशनल 10% मार्कस देवून पास करावे, अशी मागणी सुजाण नागरिक मंचातर्फे करण्यात येत आहे.

कोरोनाबरोबरच साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. पावसाळी वातावरण असल्याने डेंग्यू, मलेरिया, सर्दी ताप, न्यूमेनिया यासारख्या आजारांनी थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील सर्व जनता कोरोना आणि साथीच्या आजारांनी त्रस्त झाली आहे. त्यामुळे पालकांबरोबरच विद्यार्थीही आजाराने त्रस्त आहेत. अशातच देशातील आरोग्य संघटनेने ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक होईल असे भाकीत केले आहे. राज्यातील बरेच विद्यार्थी आजाराने ग्रस्त आहेत. शिवाय मोबाईल नेटवर्कची ग्रामीण भागात आणि शहरी भागातहि बोंब आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेणे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणे होवू शकते. अशा वातावरणात परीक्षा घेवून कोरोनाबरोबर साथीच्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि इतर सर्व परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी सुजाण नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब दाते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास केल्यास सुजाण नागरिक मंचातर्फे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा बाळासाहेब दाते यांनी मंचाच्या वतीने दिला आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.