महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून घोषित करण्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृह विभागाच्या वतीने मागणी केली आहे.
तसे पत्र त्यांनी आज ( दि. 11 मे ) मुख्यमंत्र्यांना दिले असून पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सद्य स्थितीतील कोविड-19 या साथरोगाच्या अनुषंगाने अनेक जेष्ठ पत्रकारांकडून पत्रकारांना ‘ फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित करण्याबाबत निवेदन प्राप्त होत आहेत. भारतातील इतर काही राज्यात पत्रकारांना त्या त्या राज्याने ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित केले असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा विविध स्तरातून अनेक पत्रकारांकडून ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा.
याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य निर्देश देण्याची त्यांनी विनंती गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली आहे.
——-
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.