महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंदीरे बंद होऊन ६ महीने झाली तरी मंदीर उघडण्याबाबत प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक डि.डि.भोसले पाटील केली आहे.
आळंदी तीर्थक्षेत्रासह अनेक मंदीरे असलेल्या देवस्थान गावातील अर्थ व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर अवलंबून आहे कोरोणा मुळे मंदीर बंद असल्यामुळे अर्थ व्यवस्था पुर्ण ढासळली असून देव दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणाऱ्या व्यवसाय आणि व्यापारावर आळंदी शहराची अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. परिणामी बहुतांशी प्रसादाची आणि हार फुलांचे छोटे मोठे व्यावसायिक आणि व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शहरातील बहुतेक नागरिकांचा उदरनिर्वाह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरच अवलंबून आहे.
देशातील अनेक देवस्थान अटी आणि नियमानुसार सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर सुरू करण्यात यावे. त्यामुळे आळंदी शहरातील विस्कळीत झालेली घडी सुधारेल राज्यातील भाविक आणि आळंदीकर ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन मंदीर दर्शनासाठी खुले करावे. तसेच कोरोना बाबतीत सर्व प्रकारची खबरदारी देवस्थान कमिटीने घेणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी भोसले पाटील यांनी केली आहे.
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
This website uses cookies.