महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : बैलपोळा सण आल्यामुळे राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन शहरातील जनता कर्फ्यु व नागरिकांची तपासणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शुक्रवार दि. १८ व शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या अगोदर जाहीर केलेल्या १५ व १६ या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत.
राजगुरुनगर, आळंदी, चाकण ह्या तीनही शहरातील व्यापार अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळून दि.१८ आणि दि. १९ रोजी पुर्णपणे बंद रहाणार आहे. त्या दिवशी नागरिकांची फक्त आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घरीच थांबून घरी येणाऱ्या आरोग्य सेवकास खरी माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.