महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : बैलपोळा सण आल्यामुळे राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन शहरातील जनता कर्फ्यु व नागरिकांची तपासणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शुक्रवार दि. १८ व शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या अगोदर जाहीर केलेल्या १५ व १६ या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत.
राजगुरुनगर, आळंदी, चाकण ह्या तीनही शहरातील व्यापार अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळून दि.१८ आणि दि. १९ रोजी पुर्णपणे बंद रहाणार आहे. त्या दिवशी नागरिकांची फक्त आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घरीच थांबून घरी येणाऱ्या आरोग्य सेवकास खरी माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…
शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…
गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…
This website uses cookies.