पुणे जिल्हा

भामा आसखेड च्या ५७ आंदोलक शेतकऱ्यांना अटक,

१८शेतकऱ्यांना न्यायालयीन कोठडी

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिंदे-वासुली : सोमवारी ( दि.३१) शेकडो भामाआसखेड प्रकलपग्रस्तांनी जलवाहिनेचे काम बंद करण्याची शासनाने दखल घ्यावी म्हणून शांततेच्या मार्गाने केलेल्या धरणे व जलभरो आंदोलनादरम्यान स्वत:हून अटक झालेल्या सुमारे १५० ते २०० महिला पुरुष आंदोलकांपैकी ५७ जणांवर चाकण पोलीसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. तर बाकीच्या महिला व वृद्ध शेतकऱ्यांना सोमवारी ( दि.३१ ) रात्री घरी सोडून दिले होते. अटक केलेल्या आंदोलकांना काल न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडी मिळाली.

अजय संजय नवले (रा. वहागाव), शिवाजी भगवान राजगुरव (रा.आखतुली), रामदास बबन होले (रा कासारी), सुनील रामभाऊ भालसिंग (रा. कोळीये), दत्तू ममता शिवेकर (रा.शिवे), अरुण सुदाम कुदळे (रा.देवतोरणे), नवनाथ दत्तात्रय शिवेकर (रा.शिवे), तानाजी सहादू डांगले (रा.पराळे), गणेश काळुराम जाधव (रा.गाबरवाडी) यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

देविदास पांडुरंग बांदल (रा.कासारी), सत्यवान लक्ष्मण नवले (रा.वहागाव), गजानन हरिभाऊ कुडेकर (रा.अनावळे), तुकाराम गोंविंद नवले (रा.वहागाव), कचरु भगवंता येवले (रा.टेकवडी), धोंडीभाऊ बळीराम शिंदे (आंबोली), भागुजी दत्तु राजगुरव (रा.आखतुली), संजय बबन पागांरे (रा.आखतुली), दत्तात्रय सखाराम होले (रा.कासारी), रोहिदास नामदेव जाधव (अनावळे), संदिप लक्ष्मण साबळे (रा.वाघू), संतोष गणपत साबळे(रा.वाघू) आण्णा महादु देवाडे (रा.देवतोरणे), संतोष ममतु कावडे (रा.कोळीये), मंदार विठ्ठल डागंले (रा.पराळे), किसन बळवंत नवले (रा.वहागाव),
नामदेव बबन देशमुख (देशमुखवाडी) व गौरव सहादु देशमुख (रा.देशमुखवाडी) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

सागर शिवराम होले , संजोग मधुकर होले, प्रदिप दाजी सावंत, देविदास जनार्धन साबळे, नितीन लक्ष्मण साबळे, हनुमंत शंकर रौधंळ, सोमनाथ लक्ष्मण चोरघे, उत्तम शांताराम शिवेकर, माऊली नथु जाधव, संजय बाजीराव गाडे, हिरामण बबन डांगले, विठ्ठल शंकर कुदळे, रघुनाथ महादेव होले, राजेंद्र नथु मोहन, गोविंद तुकाराम कलवडे, शांताराम विष्णु घुडे, गबाजी राणु बेंदुर, प्रदिप बबुशा होले, कैलास खंडु साबळे, नवनाथ गोपाळ बेंंडुरे, सुभास राघु नवले, मारुती ज्ञानेश्वर बेंंडुरे, शांताराम रामभाऊ बेंंडुरे, सुनील ज्ञानु बेंंडुरे, शंकर विष्णु बेंंडुरे, मारुती नामदेव बेंंडुरे, हरिचंद्र शंकर गोपाळे, मारुती विठ्ठल कलवडे, राजेश साळु ओव्हाळ, संतोष उल्हास बोरकर, सचिन रामचंद्र कलवडे, दत्ता गबाजी बेंडुरे अशा ३२ आंदोलन कर्त्याना खेड न्यायालयाने त्यांची बाँडवर सुटका केली.
शेतकऱ्यांच्या बाजूने ऍड गणेश होनराव, ऍड सचिन आरुडे, ऍड योगेश साबळे, ऍड जितेंद्र सावंत यांनी बाजू मांडली.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.