गाऊ म्हणती हे गाणं
शमी-आपट्याची पानं
बोल मूक बोलीचे हे
म्हणे जगावं सुखानं॥धृ॥
भेदभाव विसरुन
रहा सारे एकोप्यानं
माणसात माणूसकी
जागविली ह्या वृक्षानं॥१॥
व्हावं माणसाहुनी रे
काय वृक्षांनी शहाणं
वृक्ष तोडून पाडून
काय केलं माणसानं॥२॥
उपकारा ची न जाणं
नाही ठेवलेही भान
कसं म्हणावं माणूस
माणसाला दुनियानं॥३॥
हिर्व्यागार समृध्दीचं
शमी-आपट्याचं गाणं
दया शांतीचं हृदय
याचं भरलं सोन्यानं॥४॥
म्हणूनच नांव सोनं
याला दिलं दुनियानं
सण दसर्याचा मोठा
केला याच्या पाचोळ्यानं॥५॥
– निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे, धुळे
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.